4.8 C
New York
Wednesday, February 18, 2026

Buy now

spot_img
spot_img

Sambhaji Bhide : भिडेंच्या विखारी तोफेचा निशाणा आता शरद पवारांवर; राजकारणात वणवा

Sambhaji Bhide : राजकीय सभ्यतेच्या सर्व सीमा ओलांडत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा विषारी गरळ ओकली आहे. यावेळी त्यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत हल्ला चढवला असून, या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात महासंग्राम सुरू झाला आहे. भिडेंच्या या ‘जीभ घसरण्या’मुळे राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, ठिकठिकाणी संतापाचा उद्रेक पाहायला मिळत आहे.

नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत राहणाऱ्या संभाजी भिडेंनी एका जाहीर कार्यक्रमात शरद पवारांवर टीका करताना भाषेचा दर्जा राखला नाही. पवारांच्या राजकीय कारकिर्दीवर आणि वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी करताना त्यांनी अशा शब्दांचा वापर केला, जे ऐकून उपस्थितही अवाक झाले. “ज्या हातांनी महाराष्ट्र घडवला, त्याच हातांवर अशा प्रकारे चिखलफेक करणे ही विकृती आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या गोटातून येत आहे.

इतिहास, विज्ञान आणि आता ‘पवार’… भिडेंच्या वादग्रस्त विधानांची ‘मालिका

अंधश्रद्धेचा कहर: “माझ्या बागेतील आंबा खाल्ला की मुले होतात,” असे सांगून विज्ञानाची थट्टा उडवणे.

राष्ट्रपुरुषांचा अपमान: महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्याबद्दलची विधाने करून समाजात दुही निर्माण करणे.

आता थेट राजकीय युद्ध: पवारांना लक्ष्य करून भिडेंनी आता राजकीय आखाड्यात उडी घेतल्याचे चित्र दिसतय .

सत्तेचे ‘मौन’ की ‘पाठबळ’? विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल!

संभाजी भिडेंच्या या विखारी विधानांनंतर पुन्हा एकदा “भिडेंना अभय कोणाचे?” हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

“सरकार या ‘विषारी प्रवृत्ती’वर कारवाई करायला का घाबरत आहे? गृहखाते नेमकं कोणाच्या दबावाखाली आहे?” असा सवाल विरोधी पक्षांनी विचारला आहे. प्रशासनाच्या सुस्त भूमिकेमुळे भिडेंची हिंमत वाढत असून, हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे बोलले जात आहे.

ठिकठिकाणी निषेधाचे वणवे; अटकेची मागणी

भिडेंच्या विधानाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली आहेत. अनेक ठिकाणी भिडेंच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. “जर 24 तासांत कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्र बंद पाडू,” असा इशाराही काही संघटनांनी दिला आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ज्येष्ठ नेत्यांचा आणि राष्ट्रपुरुषांचा अपमान करण्याची ही ‘फॅशन’ आता थांबायला हवी. राजकीय मतभेद असू शकतात, पण भाषेची पातळी सोडून टीका करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. आता चेंडू सरकारच्या कोर्टात आहे – प्रशासन ‘बळाचा’ वापर करणार की पुन्हा ‘मौन’ पाळून वाद शमण्याची वाट पाहणार?

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या