Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RRS) सरसंघचालक मोहन भागवत मणिपूरच्या दौऱ्यावर असून एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी जर हिंदू नसतील तर जगही अस्तित्वात राहणार नाही म्हटले आहे.
या कार्यक्रमात त्यांनी भारतीय संस्कृती, समाजाची ताकद आणि देशाची दीर्घकालीन ओळख यावर विस्तृत भाष्य केले.
या वेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले की, भारत ही अशा संस्कृतीचे प्रतीक आहे जी वेळोवेळी जगाला मार्ग दाखवत आली आहे. संस्कृती आल्या आणि गेल्या, परंतु भारत आजही उभा आहे. जगातील अनेक प्राचीन संस्कृती कालांतराने नाहीशा झाल्या आहेत. इतिहासाने अनेक महान साम्राज्यांचा उदय आणि पतन पाहिला आहे, परंतु भारताला एक सांस्कृतिक वारसा आहे जो हजारो वर्षांनंतरही अबाधित आहे. परिस्थिती येते आणि जाते, परंतु भारतासारख्या संस्कृतीला काहीही नष्ट करू शकत नाही.
भागवत यांनी भारताच्या स्थिरतेचे आणि सामर्थ्याचे कारण समाजाची मूलभूत रचना आहे, जी परस्पर संबंधांवर आणि संस्कृतीच्या मुळांवर आधारित आहे यावर भर दिला. जर हिंदू समाज कमकुवत झाला तर जग देखील आपली दिशा गमावेल. आपल्या भाषणात भागवत यांनी हिंदू समाजाची भूमिका अधोरेखित केली, असे सांगून की, भारताची संस्कृतीच जगात धर्माचा खरा अर्थ आणि मूल्ये जपून ठेवते असं मोहन भागवत म्हणाले.
तसेच आपण निर्माण केलेले सामाजिक नेटवर्क ही आपली संस्कृती जिवंत ठेवते. जर हिंदू समाज अस्तित्वात राहिला नाही तर जगालाही त्याची दिशा मिळेल, कारण केवळ भारतच मानवतेला खरे धार्मिक मार्गदर्शन प्रदान करतो असं देखील ते म्हणाले.



